M.A.,M.Ed.,D.V.G.(Mumbai) पोहाळे तर्फ आळते, ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर PIN-416229 Ambewadi SO Pohale BO कोषाध्यक्ष -महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा वारणानर परिसर निवृत्त मुख्याध्यापक- श्री नवनाथ हायस्कूल पोहाळे. खजाननीस- भैरवनाथ शिक्षण संस्था,पोहाळे संस्थापक- जागृती वाचनालय, पोहाळे मा.अध्यक्ष- मराठी बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूर मा.जिल्हा उपाध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूर खजाननीस- महाराष्ट्र बालसाहित्य परिषद चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ, क्रिएटिव्ह टिचर्स फोरम या संस्थांसाठी भरीव कार्य संपादन-वारणामाय बालकुमार दिवाळी अंक ******* निवृत्तीनंतर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ३५० शाळांमध्ये कथाकथन-कथालेखन-कवितालेखन कार्यशाळा ****** हस्ताक्षर, शुद्धलेखन, प्रमाणलेखन ३५ शाळांमधून कार्यशाळा ****** ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अमळनेर कथाकथन (निमंत्रित) ३ फेब्रुवारी, २०२४ महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगर मंगळवेढा , विभागीय साहित्य संमेलन कथाकथन, २ डिसेंबर,२०२३ यासह ६५ बालसाहित्य संमेलनातून...
पर्जन्य मापनाचा इतिहास कौटिल्य पासून सुरु होतो. त्यांच्या अर्थशास्त्रात तसा उल्लेख आहे.प्रगत साधनांचा इतिहास पाचशे वर्षांपूर्वीपासून सुरू होतो. आधुनिक साधने विकसित होण्यापूर्वी दगडापासून पर्जन्यमापक यंत्र तयार केले जाई. तीन फूट व्यासाचा आणि दहा फूट उंचीचा दगड तयार केला जात असे. वरच्या बाजूला उखळासारखा आकार दिला जात असे. कमीत-कमी बाष्पीभवन व्हावे व पर्जन्य वापरण्यात अचूकता यावी यासाठी वरचा भाग निमुळता ठेवला जाई. उखळासारख्या या आकाराच्या तळाशी एक छिद्र असे. हे छिद्र चिखल व लाकडी पट्टी लावून बंद करता येत असे. असे तयार झालेले यंत्र जंगलात शेत शिवारात सहसा दृष्टिपथात येणार नाही अशा ठिकाणी खोल खड्डा खणून रोवले जाईल. पाऊस पडत असताना या वर्तुळाकार तोंडातून पाणी आज जाई या साठलेल्या पावसाच्या पाण्याचे दैनंदिन किंवा साप्ताहिक मोजमाप केले जाई व खालच्या छिद्रातून पाणी सोडून दिले जाई. पुन्हा नव्या दिवशी नवे पावसाचे पाणी आल्यानंतर त्याचे मापन केले जाई. पूर्वीच्या काळी आधुनिक सीजीएस किंवा एमकेएस पद्धतीची परिमाणे नसल्यामुळे त्यावेळच्या चिपटे,मापटे, शेर, पायली या परिमाणात पावसाचे मोजमाप...
Comments
Post a Comment